सर्व आजार हे संतुलनातील बिघाड दर्शवितात. याला कोणताही अपवाद नाही, पण या संतुलनातील बिघाडांचे अनेक प्रकार असतात. मी आत्ता फक्त शरीराबद्दलच बोलत आहे, मी प्राणाच्या नाडीगत आजारांबद्दल किंवा मानसिक आजारांबाबत बोलत नाहीये. ते आपण नंतर पाहू. आत्ता आपण फक्त या गरीबबिचाऱ्या लहानशा शरीराबद्दल बोलत आहोत. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व आजार, अगदी सर्व आजार, मग ते कोणतेही असू देत, मी त्यामध्ये अगदी अपघातसुद्धा समाविष्ट करेन, ह्या साऱ्या गोष्टी संतुलन बिघडल्यामुळे होतात.
म्हणजे असे की, तुमच्या शरीराचे सगळे अवयव, सगळे सदस्य आणि तुमच्या शरीराचे सर्व भाग हे एकमेकांशी सुसंवादी स्थितीत असतील तर, तुम्ही पूर्ण निरोगी स्थितीत असता. पण जर का कोठे अगदी थोडेसेही असंतुलन घडून आले तर, लगेच तुम्ही थोडेसे किंवा जास्त आजारी पडता, अगदी खूप जास्तसुद्धा आजारी पडता, अन्यथा मग अपघात तरी घडून येतो. जेव्हा जेव्हा आंतरिक असंतुलन असते, तेव्हा नेहमीच या गोष्टी घडून येतात.
पण तेव्हाही, तुम्ही शारीरिक संतुलनाला प्राणाच्या आणि मनाच्या संतुलनाची जोड दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या गोष्टी सुरक्षितपणे करता येणे शक्य व्हावे यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत कोणताही अपघात घडून येऊ नये म्हणून, तुमच्याकडे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक असे तिहेरी संतुलन असायलाच हवे; आणि ते संतुलन केवळ प्रत्येक भागातच असून उपयोगाचे नाही; तर पुन्हा ते तीनही भाग परस्परांशीही सुसंवादी असायला हवेत.
…इथेच या समस्येचे निराकरणही आहे. अशी असंख्य संयुगे (combinations) असतात आणि परिणामतः आजारपणाची कारणेही असंख्य असतात आणि अपघातांची कारणेही अगणित असतात. तरीही आपल्याला समजून घेणे सोपे व्हावे म्हणून, आपण त्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…