जेव्हा चैत्य पुरुष पुढे येतो तेव्हा, व्यक्तीला, साध्यासुध्या उत्स्फूर्त अशा आत्मदानासहित चैत्य पुरुषाची जाणीव होते आणि मन, प्राण व शरीर यांच्यावरील त्याच्या चढत्या-वाढत्या थेट नियंत्रणाचा व्यक्तीला अनुभव येतो; हे नियंत्रण निव्वळ झाकलेल्या किंवा अर्ध-झाकलेल्या प्रभावातून आलेले नसते, तर ते थेट नियंत्रण असते.
विशेषत: जेव्हा चैत्य विवेक येतो तेव्हा विचार, भावनिक आंदोलनं, प्राणिक आवेग, शारीरिक सवयी एकाएकी उजळून निघतात आणि तेथे काहीच धूम्राच्छादित, झाकोळलेले, तिमिरात्मक असे शिल्लक रहात नाही; चुकीच्या हिंदोळ्यांऐवजी योग्य स्पंदने त्यांची जागा घेतात. हा चैत्य विवेक दुर्लभ आणि दुर्मिळ असतो.
*
केंद्रवर्ती प्रेम, भक्ती, समर्पण, सर्वस्वदान, आध्यात्मिक दृष्ट्या योग्य काय व अयोग्य काय हे नेहमीच स्वच्छपणे पाहणारी आणि आपोआपच अयोग्य गोष्टींना नकार देणारी आंतरिक दृष्टी ही चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.
तसेच, समग्र आत्मनिवेदनाची प्रक्रिया आणि एखाद्या व्यक्तीने स्वत:मधील सर्वाचे श्रीमाताजींच्या प्रति केलेले समर्पण ही देखील चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.
– श्रीअरविंद
(CWSA 30 : 352), (CWSA 30 : 356)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…