प्रश्न : व्यक्तीने अस्तित्वाचे एकीकरण कसे करावे, हे मला जाणून घ्यावयाचे आहे.
श्रीमाताजी : व्यक्तीच्या एकीकरणाच्या ह्या कार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
१) व्यक्तीने स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी सजग होणे.
२) व्यक्तीला एकदा का आपल्या हालचाली, आवेग, विचार, संकल्पपूर्वक कृती यांविषयीची जाणीव झाली की, त्या सगळ्या गोष्टी चैत्य पुरुषासमोर मांडणे. ह्या हालचाली, आवेग, विचार व संकल्पपूर्वक कृती स्वीकारावी वा नाकारावी हे ठरविण्यासाठी, प्रत्येक गोष्ट चैत्य पुरुषाच्या समोर मांडावयाची असते. त्यापैकी ज्यांचा स्वीकार होईल त्या कायम राखल्या जातील व चालू राहतील आणि ज्या नाकारल्या जातील, त्या पुन्हा कधीही परतून येऊ नयेत ह्यासाठी, जाणिवेच्या बाहेर काढून टाकल्या जातील. हे एक दीर्घकालीन आणि काटेकोरपणे, कसून करण्याचे कार्य आहे, ते योग्य प्रकारे करण्यासाठी वर्षानुवर्षे लागू शकतात.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 414)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…