चैत्य विश्व किंवा चेतनचे प्रतल हा विश्वाचा असा एका भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो. आणि चैत्य पुरुष (Psychic Being) हा अस्तित्वाचा असा एक भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो; येथे विरोधी शक्तीची मात्रा तीळमात्रही चालू शकत नाही.
हे सुसंवादाचे विश्व असते आणि येथे प्रत्येक गोष्ट प्रकाशाकडून प्रकाशाकडे आणि प्रगतीकडून अधिक प्रगतीकडे अशी जात असते. चैत्य अस्तित्व हे दिव्य चेतनचे, व्यक्तीमधील दिव्य आत्म्याचे स्थान असते. ते प्रकाश, सत्य, ज्ञान, सौंदर्य आणि सुसंवाद यांचे केंद्र असते. हे असे केंद्र असते जे, तुमच्या प्रत्येकामधील दिव्य आत्म्याने त्याच्या अस्तित्वाने, अंशाअंशाने निर्माण केलेले असते; ज्या दिव्य चेतनेचे ते अविभाज्य भाग असते तिने ते प्रभावित झालेले असते, तिने घडविलेले असते आणि तिने ते संचालित केलेले असते.
तुमच्यामधील दिव्यतेच्या संपर्कात येण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये खोलवर चैत्य अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे. चैत्य पुरुष हा दिव्य चेतना आणि तुमची बाह्य जाणीव यांधील दुवा असतो. तो तुमच्या आंतरिक जीवनाचा रचयिता असतो; दिव्य इच्छेचा कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी त्याच्याद्वारे बाह्य प्रकृतीमध्ये अभिव्यक्त होत असतात.
जर तुम्ही तुमच्या बाह्य जाणिवेमध्ये तुमच्यामधील ह्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झालात, तर तुम्हाला शुद्ध शाश्वत चेतना गवसेल आणि तुम्ही त्यात जगू लागाल; सामान्यतः मनुष्यप्राणी ज्या अज्ञानाद्वारे संचालित होत असतो त्याद्वारे संचालित होण्याऐवजी, मग तुम्ही तुमच्या अंतरंगातील शाश्वत प्रकाश आणि ज्ञान यांच्या अस्तित्वाविषयी जागृत होता आणि त्यात तुम्ही समर्पण करता, समग्रतया त्यालाच आत्मनिवेदन करता आणि सर्व बाबींमध्ये त्याच्याद्वारेच संचालित होता.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 62)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…