विश्रांती व आरोग्य
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
पहिली कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, सर्वत्र पूर्ण समता राखणे आणि अस्वस्थ चिंताजनक विचारांना किंवा निराशेला तुमच्यामध्ये प्रवेश न करू देणे. एन्फ्लुएंझाच्या या तीव्र हल्ल्यानंतर, अशक्तपणा येणे किंवा बरे होण्याच्या प्रगतीमध्ये चढउतार असणे हे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही काय केले पाहिजे, तर शांत आणि विश्वासाने राहिले पाहिजे, कोणतीही काळजी करता कामा नये किंवा अस्वस्थ होता कामा नये. अगदी पूर्णपणे शांत राहिले पाहिजे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेण्यास तयार असले पाहिजे. चिंता करण्यासारखे काही नाही; विश्रांती घ्या म्हणजे आरोग्य आणि सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 587)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026





