Entries by श्रीमाताजी

मी माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे?

अमृतवर्षा ०३   जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि मग अशा स्थितीत तुम्ही ध्यान करू शकाल – असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यात काही तथ्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही खरी आवश्यक […]

चमत्काराचे स्वरूप

अमृतवर्षा ०२   चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. प्रथम आरोहण असते; तुम्ही जडभौतिक चेतनेमधून बाहेर पडून, उच्चतर चेतनेच्या श्रेणीमध्ये स्वत:चे उन्नयन करता. निम्नतर श्रेणीमधून उच्चतर श्रेणीमध्ये होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर श्रेणीमध्ये अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता, उन्नत होता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता […]

प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य?

अमृतवर्षा ०१ साधक : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा पूर्वनिर्धारित असते का ? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का? श्रीमाताजी : स्वाधीनता आणि प्रारब्ध (Freedom and fatality) स्वातंत्र्य आणि निश्चयवाद (liberty and determinism) या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना […]

भारत : आज आणि उद्या

भारत – एक दर्शन ३१ भारत हा एकच असा देश आहे की, जेथे आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य चालू शकते आणि ते तसे चाललेच पाहिजे. आणि त्यासाठी सुयोग्य काळ आता येथे आला आहे. …ज्या भारताकडे एकमेवाद्वितीय असा आध्यात्मिक वारसा आहे, त्या भारतासाठी – आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य प्रस्थापित होणे – ही एकमेव शक्य अशी मुक्ती असेल. * भारत […]

चेतनेचे परिवर्तन – प्रारंभबिंदू

विचारशलाका ४२   भाग – ०४ (स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.) व्यक्तीने त्या अनुभवाचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा त्याचे स्मरण ठेवावे अथवा त्याचे निरीक्षण करावे, परंतु व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद […]

चैत्य पुरुषाशी संपर्क आल्याचा अनुभव

विचारशलाका ४१   भाग – ०३   (स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.) तुम्हाला नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले असतात पण आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग […]

चेतनेच्या परिवर्तनाचा तुमचा मार्ग

विचारशलाका ४०   भाग – ०२   (स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.) व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव […]

चेतनेमध्ये परिवर्तन

विचारशलाका ३९   भाग – ०१   साधक : व्यक्तीने स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन कसे करायचे? श्रीमाताजी : अर्थातच याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आणि बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे त्या मार्गाचा संकेत आपल्याला मिळून जातो. तो मार्ग गवसण्याची पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत काहीशी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर […]

विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग

विचारशलाका ३८   (श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)   समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.  ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन […]

परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग

विचारशलाका ३७   परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची प्रत्यक्ष चेतना ही तिच्या सद्यस्थितीतील सवयी व कक्षा यांच्या पलीकडे वृद्धिंगत करणे; तिला प्रशिक्षण देणे, तिला ‘दिव्य प्रकाशा’च्या दिशेने खुली करणे, तिच्यामध्ये ‘दिव्य प्रकाशा’ला त्याचे कार्य मुक्तपणे आणि परिपूर्णपणे करू देणे. परंतु तो ‘दिव्य प्रकाश’ तेव्हाच त्याचे कार्य परिपूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो […]