भारत – एक दर्शन ३१
भारत हा एकच असा देश आहे की, जेथे आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य चालू शकते आणि ते तसे चाललेच पाहिजे. आणि त्यासाठी सुयोग्य काळ आता येथे आला आहे.
…ज्या भारताकडे एकमेवाद्वितीय असा आध्यात्मिक वारसा आहे, त्या भारतासाठी – आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य प्रस्थापित होणे – ही एकमेव शक्य अशी मुक्ती असेल.
*
भारत हा आधुनिक मानवजातीच्या सर्व समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा देश झाला आहे. भारत हाच पुनरुत्थानाची भूमी ठरेल – तो अधिक उन्नत आणि अधिक सत्य अशा जीवनाच्या पुनरुत्थानाची भूमी बनेल.
– श्रीमाताजी [CWM 13 : 370, 368]
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- प्रत्येक कणामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ - April 24, 2024
- अंतरंग व बहिरंग भाग यांचे एकत्व - April 23, 2024
- प्राणाचे उद्रेक – प्रगतीसाठीचे उपयुक्त साधन? - April 21, 2024