आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व उच्चतर स्तरांवर आरोहण करते आणि त्याच वेळी ती व्यक्ती त्या उच्चतर स्तरांवरील शक्ती मन व प्राणामध्ये उतरवते. एवढेच नव्हे तर, सरतेशेवटी त्या व्यक्तीकडून ती शक्ती अगदी शरीरापर्यंत खाली उतरवली जाते. अतिमानस (supermind) हा या स्तरांमधील सर्वोच्च स्तर आहे आणि (अतिमानस अवतरित करणे हे) पूर्णयोगाचे ध्येय आहे. जेव्हा अतिमानस अवतरित करणे शक्य येईल तेव्हाच पृथ्वी-चेतनेचे दिव्य रूपांतरण (transformation) शक्य होईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 376)
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले…
निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर…
साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का? श्रीअरविंद…
व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र…
(एका साधकाने विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर श्रीअरविंदांनी त्यांच्या सचिवांना सांगितले आहे आणि सचिव श्रीअरविंदांच्या वतीने लिहीत…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) उन्मुखता किंवा खुलेपणा ही गोष्ट काही अगदी सुरुवातीपासूनच पूर्णत्वाला पोहोचलेली असते…