(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
उन्मुखता किंवा खुलेपणा ही गोष्ट काही अगदी सुरुवातीपासूनच पूर्णत्वाला पोहोचलेली असते असे नाही. सुरुवातीला अस्तित्वाचा एखादा भाग उन्मुख होतो आणि चेतनेचे इतर भाग हे अजूनही बंद किंवा अर्धवट उन्मुख झालेले असतात; ते सर्वच्या सर्व भाग खुले व्हावेत म्हणून व्यक्तीने अभीप्सा (aspire) बाळगणे आवश्यक असते.
अगदी सर्वोत्तम आणि प्रगत साधकांमध्ये देखील पूर्ण खुलेपण येण्यासाठी काही कालावधी लागतो. तसेच एखादा साधक अध्यात्ममार्गाच्या वाटचालीमध्ये आड येणाऱ्या गोष्टी कोणताही संघर्ष न करताच सोडू शकला आहे, असेही आढळत नाही.
आणि त्यामुळे, अडीअडचणीच्या वेळी तुम्ही श्रीमाताजींकडे मदतीसाठी साद घातलीत तर ती त्यांच्या कानी पडणार नाही, असे समजू नका. मानवी प्रकृतीच्या अडीअडचणी श्रीमाताजी जाणतात आणि त्याच तुम्हाला या साऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करतील. धीर धरा, त्यांच्यापाशी नेहमी प्रार्थना करत राहा. तसे केलेत तर, प्रत्येक अडचणीनंतर तुमची प्रगती होईल.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 156-157)
ईश्वरी प्रभावासमोर स्वत:ला खुले, उन्मुख करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या…
योगाभ्यासामध्ये सर्व प्रकारच्या आसक्तींवर मात करून, फक्त ईश्वराभिमुख होण्याचा संकल्प अंतर्भूत असतो. प्रत्येक पावलागणिक ईश्वरी…
आंतरिक अस्तित्वाने ऊर्ध्वमुख होत, ईश्वराची प्रार्थना करत, त्याला अत्यंत आर्ततेने साद घालणे म्हणजे अभीप्सा! दिव्य…
(''ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ…
फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि…
ईश्वराकडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग…