हे विश्व म्हणजे केवळ एक जडभौतिक वस्तू नाही तर, ते आध्यात्मिक तथ्य आहे. जीवन म्हणजे काही केवळ शक्तींची क्रीडा नाही किंवा जीवन म्हणजे काही केवळ एक मानसिक अनुभवदेखील नाही; तर गुप्त असणाऱ्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी असलेले ते क्षेत्र आहे.
मानवी जीवन जेव्हा हे सत्य अवगत करून घेईल आणि जेव्हा त्याने त्या सत्याला स्वतःच्या जीवनाची प्रेरक-शक्ती बनवलेली असेल आणि त्या सत्याच्या प्रभावी साक्षात्काराची साधने जेव्हा त्याने शोधून काढलेली असतील तेव्हाच मानवी जीवनाला त्याची सार्थकता गवसेल आणि ते स्वतःच्या अतीत असणाऱ्या कशामध्ये तरी स्वतःचे रूपांतरण करून घेईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 374)
भौतिक विश्वामधील सचेत जीव म्हणून आपल्या अस्तित्वाची नेमकी वास्तविकता काय आहे आणि त्याचा अर्थ…
(व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि…
(पूर्वार्ध) व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वराचे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वराची जाणीव कधीच…
प्रत्येक जीव हा त्या विधात्याप्रमाणे (Creator) सचेत झाला पाहिजे, हे या सृष्टीचे ध्येय आहे,…
साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे? श्रीमाताजी : ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती…
ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वराला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली…