ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: जीवनऋतू

जगाची नवनिर्मिती तरुणच करतील

 

भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे आणि त्याची निर्मिती तरुणांनीच केली पाहिजे. हे जग जसे नूतन आहे तसेच ते सत्य, धैर्य, न्याय, उदात्त आकांक्षा आणि निखालस परिपूर्तीचे सुद्धा आहे. आपण असे जग निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

भ्याड लोकांना किंवा जे स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडत आहेत अशा लोकांना किंवा नुसत्या वाचाळवीरांना, म्हणजे जे आरंभशूर असतात आणि त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अनुयायांना जे तसेच गर्तेत सोडून देतात अशा लोकांना, भावी घडामोडीच्या काळामध्ये कोणताही थारा नाही.

ज्या पायावर राष्ट्राचे भवितव्य उभारले जाऊ शकते तो एकमेव पाया म्हणजे धाडसी, मोकळे, प्रांजळ, शुद्ध अंतःकरणाचे, धैर्यशील आणि आकांक्षा बाळगणारे तरुण.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 168)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

तारुण्य म्हणजे काय?

  प्रामाणिकपणा, विनम्रता, चिकाटी आणि प्रगतीसाठी असणारी दुर्दम्य तृष्णा या गोष्टी आनंदी व सफल जीवनासाठी…

1 day ago

तारुण्याचा खरा अर्थ

  तुम्ही तरुण मुलं म्हणजे देशाची आशा आहात आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला…

2 days ago

सुट्टीचा सदुपयोग

  शिक्षिका : शाळेला लागलेली सुट्टी व्यतीत करण्याचा उत्तम मार्ग कोणता असे विद्यार्थी मला विचारत…

3 days ago

दुर्गुणांचे शुद्धीकरण

  (मुलांचे नैतिक शिक्षण आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारी संधी याविषयीचे विचार आपण कालच्या भागात…

4 days ago

नैतिक शिक्षणाची संधी

  (विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण कसे द्यावे हे श्रीअरविंद यांनी सांगितले होते, ते आपण कालच्या भागात…

5 days ago

नैतिक शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत

विद्यार्थ्यांना सदाचरणासाठी प्रेरित केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये…

6 days ago