(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील वानप्रस्थाश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘संन्यासाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)
संन्यासाश्रम
जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर व्यक्ती उरलेसुरले बंध टाकून देण्यास आणि सामाजिक जीवनाच्या सर्व प्रकारांपासून पराकोटीच्या आध्यात्मिक निर्लिप्ततेने, अनासक्तीने या जगामध्ये वावरण्यास मोकळी असे. या टप्प्यावर ती व्यक्ती जीवनाच्या अगदी किमान गरजांची पूर्ती करत असे आणि विश्वात्म्याशी संवाद साधून, अनंताच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या जिवाची तयारी करून घेत असे.
हे जीवनचक्र सर्वांना बंधनकारक होते असे मात्र नाही. त्यातील बहुसंख्य लोक हे पहिल्या दोन टप्प्यांच्या पुढे कधीच जात नसत. बरेच जण वानप्रस्थाश्रमामध्ये किंवा अरण्यवासामध्ये असतानाच निधन पावत असत. अगदी थोडेच जण अंतिम पराकोटीचे धाडस करून, परिव्राजकाचे जीवन स्वीकारत असत.
मानवी जिवाची संपूर्ण वाटचाल डोळ्यांसमोर ठेवून, त्यानुसार या जीवनचक्राची गांभीर्यपूर्वक आखणी करण्यात आलेली असल्यामुळे, प्रत्येक जिवाची खरोखरच जेवढी प्रगती झालेली असेल त्यानुसार प्रत्येक व्यक्ती या प्रणालीचा लाभ घेऊ शकत असे. हे जीवनचक्र पूर्ण करण्याइतपत ज्यांची विद्यमान जन्मामध्येच पुरेशी प्रगती झालेली असे ते, या प्रणालीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकत असत.
• श्रीअरविंद (CWSA 20 : 175-176)
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'वानप्रस्थाश्रम' ही संकल्पना जाणून…
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'गृहस्थाश्रम' ही संकल्पना जाणून घेऊ.)…
(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत.…
प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते. * निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे. • श्रीमाताजी…
तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक…
(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत...) साधक : एखाद्या व्यक्तीला…