(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील वानप्रस्थाश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘संन्यासाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)
संन्यासाश्रम
जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर व्यक्ती उरलेसुरले बंध टाकून देण्यास आणि सामाजिक जीवनाच्या सर्व प्रकारांपासून पराकोटीच्या आध्यात्मिक निर्लिप्ततेने, अनासक्तीने या जगामध्ये वावरण्यास मोकळी असे. या टप्प्यावर ती व्यक्ती जीवनाच्या अगदी किमान गरजांची पूर्ती करत असे आणि विश्वात्म्याशी संवाद साधून, अनंताच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या जिवाची तयारी करून घेत असे.
हे जीवनचक्र सर्वांना बंधनकारक होते असे मात्र नाही. त्यातील बहुसंख्य लोक हे पहिल्या दोन टप्प्यांच्या पुढे कधीच जात नसत. बरेच जण वानप्रस्थाश्रमामध्ये किंवा अरण्यवासामध्ये असतानाच निधन पावत असत. अगदी थोडेच जण अंतिम पराकोटीचे धाडस करून, परिव्राजकाचे जीवन स्वीकारत असत.
मानवी जिवाची संपूर्ण वाटचाल डोळ्यांसमोर ठेवून, त्यानुसार या जीवनचक्राची गांभीर्यपूर्वक आखणी करण्यात आलेली असल्यामुळे, प्रत्येक जिवाची खरोखरच जेवढी प्रगती झालेली असेल त्यानुसार प्रत्येक व्यक्ती या प्रणालीचा लाभ घेऊ शकत असे. हे जीवनचक्र पूर्ण करण्याइतपत ज्यांची विद्यमान जन्मामध्येच पुरेशी प्रगती झालेली असे ते, या प्रणालीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकत असत.
• श्रीअरविंद (CWSA 20 : 175-176)
जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…
जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…
(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…
साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…