व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या मोबदल्यात कोणत्याही वैयक्तिक फलाची अपेक्षा न बाळगणे; हे असे जीवन जगणे म्हणजे ईश्वरासाठी जीवन जगणे. प्रारंभी, म्हणजे जेव्हा ईश्वर हा व्यक्तीच्या दृष्टीने केवळ एक शब्द असतो किंवा ईश्वर म्हणजे नुसती एक कल्पना असते, ईश्वराचा तिला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो तेव्हा ईश्वरासाठी जीवन जगणे वगैरे गोष्टी या फक्त मानसिक असतात. पण व्यक्ती जर पुन्हापुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिली तर एके दिवशी तिला अनुभव येतो आणि तिला असे जाणवते की, ती जे अर्पण करत आहे ते कोणत्यातरी एखाद्या खऱ्याखुऱ्या, स्पर्शनीय, सघन आणि सर्वोपकारी अशा गोष्टीला अर्पण होत आहे.
व्यक्ती याबाबतीत जितकी जास्त प्रामाणिक आणि परिश्रमी असेल तितके अनुभव लवकर येतील आणि ते अधिक काळ टिकून राहतील. प्रत्येक व्यक्तिगणिक मार्गाच्या तपशिलांमध्ये फरक असतो पण प्रामाणिकपणा आणि प्रयत्नसातत्य, चिकाटी या गोष्टी सर्व मार्गांसाठी सारख्याच अपरिहार्य असतात.
• श्रीमाताजी (CWM 16 : 294)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…
(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे…