ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अदिव्य शक्तींना नकार

 

साधक : अहंभावात्मक व अज्ञानी शक्ती आणि श्रीमाताजींची दिव्य शक्ती यामध्ये एखाद्या साधकाला जर पूर्णतः फरक करता येत नसेल आणि तो कनिष्ठ शक्तींना नकार देऊ शकत नसेल, तर त्या साधकाची अवस्था कशी होईल? त्या साधकाने योगमार्गाचा अवलंब करण्यासाठी कोणते पाऊल उचलले पाहिजे?

श्रीअरविंद : कोणतीही व्यक्ती अगदी सुरुवातीलाच दिव्य शक्ती आणि अदिव्य व कनिष्ठ शक्तींमध्ये पूर्णपणे फरक करू शकत नाही किंवा त्या कनिष्ठ शक्तींना लगेचच पूर्णपणे नकारही देऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण यश येईपर्यंत त्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहणे, ही गोष्ट अनिवार्य असते. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंगी संपूर्ण प्रामाणिकपणा असतो तोपर्यंत ईश्वरी कृपा निश्चितपणे व्यक्तीसोबत असते आणि ती कृपा त्या व्यक्तीला योगमार्गावर प्रत्येक क्षणी साहाय्य करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 225)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

वानप्रस्थाश्रम

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'वानप्रस्थाश्रम' ही संकल्पना जाणून…

10 hours ago

गृहस्थाश्रम

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'गृहस्थाश्रम' ही संकल्पना जाणून घेऊ.)…

1 day ago

ब्रह्मचर्याश्रम

(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत.…

2 days ago

प्रामाणिकपणामध्ये मुक्ती आहे

  प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते. * निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे. • श्रीमाताजी…

3 days ago

प्रामाणिकपणा आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण

  तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक…

4 days ago

महाकालीचे प्रहार

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत...) साधक : एखाद्या व्यक्तीला…

5 days ago