मनुष्यामध्ये असणारी ईश्वरी उपस्थिती हे प्रत्येक व्यक्तीचे सत्य असते, तो व्यक्तीचा आंतरिक धर्म (inner law) असतो. आणि हा आंतरिक धर्मच तिच्या जीवनाचा स्वामी आणि मार्गदर्शक असला पाहिजे. तुम्ही जेव्हा या आंतरिक धर्माचे म्हणणे शिरसावंद्य मानण्याची सवय लावून घेता, जेव्हा तुम्ही त्याचे पालन करता, जेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करता, त्या धर्माने तुमच्या जीवनाला मार्गदर्शन करावे असा अधिकाधिक प्रयत्न तुम्ही करता, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती सत्य, शांती, सुसंवाद यांचे एक वातावरण निर्माण करता. आणि साहजिकपणे त्याचा परिणाम वस्तुमात्रांवर, परिस्थितीवर होतो. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात वावरता त्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही न्याय, सत्य, सुसंवाद, करुणा, समजूतदारपणा, परिपूर्ण सदिच्छा यांची जणू मूर्तीच असता तेव्हा, ही आंतरिक वृत्ती, जितकी जास्त प्रामाणिक आणि समग्र असेल तेवढ्या प्रमाणात तिचा बाह्य परिस्थितीवर परिणाम होतो. म्हणजे त्यामुळे जीवनातील अडचणी नाहीशा होतात असे नाही, पण त्या आंतरिक वृत्तीमुळे, या अडीअडचणींना एक नवीन अर्थ प्राप्त होतो आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक नवे सामर्थ्य लाभते, एक नवीन शहाणीव (wisdom) प्राप्त होते. (उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)
जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…
जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…
(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…
साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…