(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण श्रीमाताजी समजावून सांगत आहेत.)
व्यक्तीमध्ये एखादा घटक असा असतो की, त्याच्यामध्ये अभीप्सा असते, तो ईश्वराप्रत समर्पित असतो आणि त्याचवेळी त्या व्यक्तीमध्ये इतर काही घटक असे असतात – कधीकधी एखादा छोटासाच घटक असतो, तर कधीकधी मोठाही असू शकतो – तो तळाशी, खूप खोलवर व्यवस्थित लपून बसलेला असतो. तो कोणाला सापडू नये अशा रितीने कोणतीही चुळबूळ न करता, अगदी शांतपणे तेथे दडून बसलेला असतो आणि तो त्याच्या पूर्ण ताकदीनिशी बदलासाठी विरोध करत राहतो.
व्यक्ती मात्र विचार करत राहते, “माझ्यामध्ये इतकी उत्कट अभीप्सा आहे, इतकी सदिच्छा आहे, माझ्यामध्ये बदल करावा असे मला अगदी मनापासून वाटत आहे, आणि असे असूनही माझ्यामध्ये काहीच बदल होत नाहीये. असे का?” अशा वेळी त्या व्यक्तीचा मानसिक उद्धटपणा आड येतो आणि म्हणू लागतो, “मला माझ्या योग्यतेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाहीये, ईश्वरी कृपा मला साहाय्य करत नाहीये आणि मला एकट्यालाच हे सारे प्रयत्न करावे लागत आहेत. इत्यादी इत्यादी…” पण हे तसे नसते.
तो तुमच्यामध्येच वेटोळे घालून बसलेला, पुष्ट झालेला, स्वतःमध्येच मश्गुल झालेला आणि दडून बसलेला, तुमच्यामधीलच एक घटक असतो. तो जणू काही पेटीच्या अगदी तळाशी लपून राहिलेला, बदल करण्यास नकार देणारा घटक असतो. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 06 : 242-243)
(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत...) साधक : एखाद्या व्यक्तीला…
(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले.…
(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले…
(श्रीमाताजीकृत प्रार्थना...) हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो…
(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी…
साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का? श्रीमाताजी : ती शरणागती…