(व्यक्तीला अमुक एखादी वाईट सवय सोडावी, असे वाटत असते पण तसे करणे तिला जमत नसते. अशा वेळी काय करावे असे श्रीमाताजींना एका साधकाने विचारले आहे, त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर…)
प्रामाणिकपणा अंगी बाणवा. अन्यथा एखाद्या फळामध्ये जशी लहानशी अळी लपून बसलेली असते, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये एखादी सवय सोडण्याविषयीची अनिच्छा दडून बसलेली असते. व्यक्ती स्वत:शीच म्हणत राहते की, ”नाही, मला हे जमत नाहीये.” पण हे काही खरे नसते, व्यक्तीची इच्छा असेल तर ती निश्चितपणे ठरवलेली गोष्ट करू शकते.
काही जण मला म्हणतात की, त्यांच्याकडे इच्छाशक्ती (willpower) नाहीये. तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ते प्रामाणिक नसतात. कारण जगातील कोणत्याही इच्छांपेक्षा प्रामाणिकपणा ही अधिक बलशाली शक्ती आहे. प्रामाणिकपणा कोणत्याही गोष्टीत निमिषार्धात बदल घडवून आणू शकतो, तो त्या इच्छेचा ताबा घेतो, तिला बाहेर ओढून काढतो आणि मग ती इच्छा संपून गेलेली असते. पण तुम्ही मात्र डोळेझाक करता आणि तुमच्या (इच्छावासनांसाठी) सबबी शोधून काढता.
– श्रीमाताजी (CWM 08 : 19)
प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य…
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…