व्यक्तीकडे संपूर्णपणे पारदर्शी प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे कारण आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. संपूर्णपणे प्रामाणिक अशी अवघी शंभरच माणसं या पृथ्वीवर असतील. माणसाची प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते, ती खूप जटिल आहे. मनुष्य सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी शोधत असतो.
योग हा सर्वांगाने प्रामाणिक बनण्याचा मार्ग आहे. संपूर्णत: प्रामाणिक असणे अवघड असते पण एखादी व्यक्ती किमान मानसिकरित्या तरी प्रामाणिक होऊ शकते…
दिव्य शक्ती विद्यमान आहे, पूर्वी कधीही नव्हती अशा रितीने ती आज उपस्थित आहे; पण माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे ती येथे अवतरित होण्यापासून रोखली जात आहे, त्यामुळे तिची अनुभूती येऊ शकत नाही. सर्व जगच खोटेपणामध्ये, असत्यामध्ये जगत आहे. आत्तापर्यंतचे माणसांमाणसांतील सर्व नातेसंबंध हे खोटेपणा व फसवणुकीवर आधारलेले आहेत.
राष्ट्राराष्ट्रांमधील राजनैतिक संबंधही खोटेपणावर आधारलेले आहेत. त्यांना ‘शांती हवी आहे’ असा ते एकीकडे दावा करत असतात आणि त्याचवेळी ते स्वत:ची सामरिक ताकद वाढवीत चालले आहेत. माणसांमधील व राष्ट्राराष्ट्रांमधील पारदर्शी प्रामाणिकपणामुळेच रूपांतरण झालेले जग अस्तित्वात येऊ शकेल.
– श्रीमाताजी (CWM 13 : 268)
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'वानप्रस्थाश्रम' ही संकल्पना जाणून…
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'गृहस्थाश्रम' ही संकल्पना जाणून घेऊ.)…
(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत.…
प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते. * निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे. • श्रीमाताजी…
तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक…
(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत...) साधक : एखाद्या व्यक्तीला…