साधना, योग आणि रूपांतरण – १६३
पूर्णयोगांतर्गत भक्ती
पूर्णयोगांतर्गत भक्तिमार्ग सात अवस्थांमधून प्रगत होत राहतो. आधीच्या अवस्थेतून पुढच्या अवस्थेत अशा रीतीने तो प्रगत होतो.
त्या सात अवस्था पुढीलप्रमाणे – अभीप्सा आणि आत्म-निवेदन ही पहिली अवस्था. दुसरी अवस्था म्हणजे भक्ती. पूजाअर्चा व आराधना ही तिसरी अवस्था. प्रेम ही चौथी अवस्था. ‘ईश्वरा’कडून व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाचा आणि जीवनाचा ताबा घेतला जाणे ही पाचवी अवस्था. ‘ईश्वरी प्रेमा’चा हर्ष आणि ‘ईश्वरा’चे सौंदर्य व माधुर्य ही सहावी पायरी आणि ‘परमेश्वरा’चा ‘परम आनंद’ ही सातवी अवस्था.
श्रद्धा ही आपली पहिली गरज असते. कारण ‘ईश्वरा’वरील श्रद्धेविना, जीवनावरील श्रद्धेविना आणि ‘ईश्वरी अस्तित्वा’च्या सर्व-महत्तेवरील श्रद्धेविना, अभीप्सा बाळगणे किंवा समर्पित होणे याला कारणच उरत नाही. श्रद्धा नसेल तर त्या अभीप्सेमध्ये कोणतीही ताकद किंवा समर्पणाच्या पाठीशी कोणतीही शक्ती असू शकणार नाही. व्यक्तीकडे जर मध्यवर्ती आणि मूलभूत स्वरूपाची दृढ श्रद्धा असेल तर तिच्या मनात शंका असल्या तरी त्याने फारसा फरक पडत नाही. शंका येऊ शकतात पण अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रद्धारूपी शिळेपुढे त्यांचा टिकाव लागू शकत नाही. श्रद्धारूपी ही शिळा कदाचित शंकारूपी आणि निराशारूपी कल्लोळांमुळे, लाटांमुळे काही काळासाठी झाकल्यासारखी होईल पण (त्या लाटा ओसरल्या की मग) ती शिळा जशीच्या तशी अचल आणि अभेद्य रूपात उभी असल्याचे आढळून येईल.
हृदयामध्ये, जेथे चैत्य पुरुषाचा निवास असतो तेथे म्हणजे आंतरिक हृदयामध्ये ही श्रद्धा असते. बाह्य हृदय हे प्राणिक अस्तित्वाचे, जीवनामधील व्यक्तिमत्त्वाचे स्थान असते. शंका या मनामधून, प्राणामधून आणि शारीरिक चेतनेमधून निर्माण होतात. मनाप्रमाणेच प्राणिक अस्तित्वाचादेखील ‘ईश्वरा’वर विश्वास बसू शकतो किंवा उडू शकतो. आंतरात्मिक अग्नी जितका प्रखर असेल तेवढ्या प्रमाणात मन, प्राण आणि शारीर-चेतनेला मलीन आणि अंधकारमय करून टाकण्याऱ्या शंकेची तीव्रता कमी असेल.
– श्रीअरविंद (CWSA 12 : 347-348)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…