साधना, योग आणि रूपांतरण – ११९

(श्री अरविंद एका साधकाला पत्रामध्ये लिहीत आहेत….)

तुम्ही कार्यासाठी (ईश्वरी) ‘शक्ती’चा उपयोग करून घेतलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या ‘शक्ती’चे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब तितकीशी महत्त्वाची नसते; तर ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले गेले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक नसेल आणि प्राणिक असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’चे ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 271)

श्रीअरविंद