ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ७१

(आपण आजवर ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, त्याच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करावी इत्यादी गोष्टी समजून घेतल्या. आता ध्यानाची परिणती ज्या ‘समाधी’मध्ये होत असते त्या समाधी-अवस्थेसंबंधी काही जाणून घेऊया.)

समाधी अवस्थेमध्ये असताना, आंतरिक मन, प्राण आणि देह ही अस्तित्वं बाह्यवर्ती मन, प्राण आणि शरीरापासून अलग झालेली असतात, ती बाह्यवर्ती अस्तित्वाने आच्छादलेली नसतात आणि त्यामुळे त्यांना सहजतेने आंतरिक अनुभव येऊ शकतात.

बाह्यवर्ती मन हे एकतर शांत, निश्चल झालेले असते किंवा काही प्रकारे ते आंतरिक अनुभव प्रतिबिंबित करत असते किंवा त्या अनुभवामध्ये सहभागी झालेले असते.

मध्यवर्ती चेतना ही मनामधून पूर्णतया अलग झालेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, ती अशी पूर्ण समाधी अवस्था आहे, की ज्यामध्ये कोणत्याच अनुभवांची नोंद होत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 249-250)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

14 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

2 days ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

3 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

4 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

5 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

6 days ago