साधना, योग आणि रूपांतरण – ७०
अगदी पूर्ण शांतपणे बसावेसे वाटणे आणि निद्रेचा अंमल जाणवणे या गोष्टींचे आळस हे कारण नसते. आणि ही समजूत तुम्ही डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. अविचल, शांत राहावे आणि अंतरंगामध्ये प्रवेश करावा याकडे तुमचा कल वळत आहे, हे त्याचे कारण आहे. साधना जेव्हा काहीशा उत्कटतेने सुरू होते तेव्हा बऱ्याचदा काही काळ असे वाटत राहते. नंतर आंतरिक आणि बाह्य चेतना यांमध्ये अधिक प्रमाणात समतोल साध्य होतो किंवा असे म्हणणे अधिक उचित ठरेल की, बाह्य चेतनेमध्ये परिवर्तन घडू लागते आणि ती आंतरिक चेतनेशी तादात्म्य पावू लागते. त्यामुळे (ध्यानाच्या वेळी झोप येणे या गोष्टीमुळे) तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका.
*
(ध्यानाच्या वेळी झोप लागण्याच्या प्रवृत्तीबाबत श्रीअरविंद येथे लिहीत आहेत.) योगसाधना करण्यास ज्यांनी नुकताच आरंभ केला आहे अशा व्यक्तींना जाणवणारा हा एक सर्वसाधारण अडथळा आहे. ही झोप हळूहळू दोन मार्गांनी नाहीशी होते.
०१) एकाग्रताशक्ती अधिक तीव्र केल्यामुळे
०२) निद्रा स्वतःच एक प्रकारच्या स्वप्न-समाधीमध्ये परिवर्तित होते; स्वप्न-समाधीमध्ये व्यक्तीला स्वप्नांखेरिज जे आंतरिक अनुभव येत असतात त्यांची तिला जाणीव असते. (म्हणजे, येथे जाग्रत चेतना काही काळासाठी हरविल्यासारखी होते, परंतु तिची जागा निद्रेद्वारे घेतली जात नाही तर ती अंतर्मुख चेतनेद्वारे घेतली जाते. या स्थितीमध्ये व्यक्ती मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाच्या अतिभौतिकामध्ये वावरत असते.)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 319, 320)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…