विचारांवर नियंत्रण
साधना, योग आणि रूपांतरण – ६५
मन निश्चल-नीरव करण्यासाठी, येणारा प्रत्येक विचार परतवून लावणे पुरेसे नसते, ती केवळ एक दुय्यम क्रिया असू शकते. तुम्ही सर्व विचारांपासून दोन पावले मागे सरले पाहिजे आणि विचार आलेच तर नीरव चेतना या भूमिकेतून त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, मात्र स्वतःहून विचार करायचे नाहीत किंवा विचारांबरोबर एकरूप व्हायचे नाही अशा रीतीने त्या विचारांपासून स्वतःला अलग केले पाहिजे. विचार म्हणजे पूर्णपणे बाहेरच्या गोष्टी आहेत, असे तुम्हाला वाटले पाहिजे. तसे झाले तर मग, विचारांना नकार देणे किंवा मनाची अविचलता बिघडवू न देता त्यांना तसेच निघून जाऊ देणे, या गोष्टी सहजसोप्या होतील.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- उन्मुखता आणि प्रगती - August 19, 2026
- पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त - August 18, 2026
- योगाभ्यासामधील प्रमुख गोष्ट - August 17, 2026






