साधना, योग आणि रूपांतरण – ४७

ध्यानासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करता येणे शक्य असेल आणि ती नेहमी पाळणे शक्य असेल तर ते नक्कीच इष्ट ठरेल.
*
तुमची चेतना जागृत ठेवायची असेल तर तुम्ही ध्यानासाठी एक ठरावीक वेळ राखून ठेवली पाहिजे आणि श्रीमाताजींचे स्मरण करून, आमच्या संपर्कात राहिले पाहिजे. ध्यानामध्ये काही विघ्न आले तर, तुम्हाला जे प्राप्त झालेले असते ते नष्ट होत नाही, पण ते माघारी फिरण्याची शक्यता असते आणि ते पुन्हा आविर्भूत व्हायला वेळ लागतो आणि म्हणून (आपल्यातील) तो धागा तुटता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 312)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)