भारत – एक दर्शन २३
मूलतः महाभारताचा जो साहित्य-प्रकार आहे तोच रामायणाचादेखील आहे. फरक एवढाच की रामायणाचा आराखडा अधिक साधा आहे, त्यातील वृत्ती अधिक सुकुमार आदर्शवादी आहे आणि त्यामध्ये काव्यात्मक ऊबदारपणा आणि रंग यांचा तजेला अधिक आहे. रामायणामध्ये उत्तरकालीन कवींनी पुष्कळच भर घातलेली असली तरीसुद्धा, या महाकाव्याचा अधिकांश भाग हा एकहाती लिहिण्यात आलेला आहे, हे अगदी स्पष्ट आहे, आणि महाभारताच्या तुलनेत त्यामध्ये जटिलता कमी आहे तसेच त्यामध्ये रचनेची स्वाभाविक अशी एकसंधता आहे. रामायणाचा आविष्कार हा फारसा तत्त्वज्ञानात्मक नाही, तो शुद्ध काव्यात्मक मनाचा आविष्कार अधिक आहे. तो रचनाकाराचा आविष्कार असण्यापेक्षा अधिक प्रमाणात एका कलाकाराचा आविष्कार आहे. आरंभापासून अंतापर्यंत रामायणाची कथा एकसंध आहे आणि ती कथा कथानकाचा मुख्य प्रवाह कधीच सोडत नाही.
असे असूनसुद्धा त्यामध्ये दृष्टीची विशालता आहे, रामायणाच्या संकल्पनेमध्ये महाकाव्यात्मक उदात्ततेची महाभारताहून अधिक मोठी, विस्तृत-पंखांची झेप आहे त्यामध्ये तपशीलवार मांडणीचा बारकावा अथपासून इतिपर्यंत तसाच कायम राखण्यात आला आहे आणि त्यामध्येच एक प्रकारची समृद्धी आहे. महाभारताची रचनात्मक शक्ती, सशक्त कारागिरी आणि त्याची पिंड-प्रकृती ही एखाद्या भारतीय स्थापत्यकाराची आठवण करून देणारी आहे तर, रामायणाच्या रूपरेषेची स्पष्टता आणि त्याची भव्यता, त्यातील रंगाची समृद्धी आणि रामायणाचे तपशीलवार आलंकारिक प्रत्यक्षीकरण यामुळे रामायणातून आत्म्याच्या साहित्याचे सूचन होते आणि भारतीय चित्रकलेच्या शैलीची आठवण येते. (क्रमश: …)
– श्रीअरविंद [CWSA 20 : 349]
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…