विचारशलाका २०
(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या निवडीमुळे त्याला जर शांती लाभत असेल तर त्याने खुशाल तसे करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोग) सुद्धा, माझ्या कार्यक्षेत्रात भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे, असे मला आढळून आले.
अन्य ध्येयं जशी आध्यात्मिक आहेत, तसेच हे ध्येयदेखील ‘आध्यात्मिक’ आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा पाठपुरावा करणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाबद्दलचा आणि विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप याविषयीचा हा अनुभव व हा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ समग्र सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण (pursuit) करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. पण अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा ‘योग’ (पूर्णयोग) आचरणे त्याला शक्य होणार नाही.
– श्रीअरविंद [CWSA 35 : 234]
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…