जागरुकता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय.
तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा किंवा तुम्ही एखाद्या प्रलोभानास बळी पडण्यास स्वत:ला मुभा देत असाल तर अशा वेळी (निष्क्रिय) जागरुकता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर सक्रिय जागरुकता ही प्रगतीची संधी मिळविण्यासाठी धडपडत असते, त्वरेने प्रगती करता यावी म्हणून, प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी ती प्रयत्नशील असते.
तुमचे पतन होण्यापासून तुम्हाला रोखणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. जो जागरूक नाही, दक्ष नाही तो जणूकाही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या प्रयोजनाशी असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो. अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका गर्तेत पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 202-203]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…