‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्री. अरविंद घोष यांची अलीपूरच्या कारावासातून सुटका झाली तो दिवस होता दि. ६ मे १९०९. आणि लगेचच म्हणजे दि. १९ जून रोजी त्यांनी ‘कर्मयोगिन्’ हे साप्ताहिक सुरु केले. राष्ट्रीय धर्म, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाष्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे साप्ताहिक सुरु केले होते. त्यामागची भूमिका त्यांच्याच शब्दांत जाणून घेणे उचित ठरेल…
ते लिहितात, “भारतीयत्व ही केवळ एक भावना आहे, अजूनही त्या विषयीचे ज्ञान नाहीये. काही निश्चित अशी धारणा वा सखोल मर्मदृष्टी नाहीये. अजून आपण आपल्या स्वत:ला जाणून घ्यावयाचे आहे, आपण कोण होतो, कोण आहोत आणि कोण असणार आहोत; आपण भूतकाळात काय केले आहे आणि आपण भविष्यामध्ये काय करण्याची क्षमता बाळगतो, आपला इतिहास काय, आपले कार्य काय याविषयी आपण अनभिज्ञ आहोत. ‘कर्मयोगिन्’ने हे ज्ञान प्रचलित करण्याचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. वेदान्त असो वा सूफिवाद असो, मंदिर असो वा मशीद असो, नानक, कबीर, रामदास, चैतन्य किंवा गुरु गोविंद असोत, ब्राह्मण, कायस्थ आणि नामशूद्र असोत, कोणतीही राष्ट्रीय संपदा असो, मग ती अस्सल भारतीय असो किंवा आपण ती आपल्याप्रमाणे अनुकूल करून घेतलेली असो, ती ज्ञात करून घेणे आणि तिला तिचे योग्य स्थान देणे, तिची योग्यता ओळखणे हे ‘कर्मयोगिन्’ने आपले कार्य मानले आहे.
राष्ट्रीय जीवन आणि त्याचे भविष्य घडविण्यासाठी या राष्ट्रीय संपदेचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणे हे आमचे दुसरे कार्य होय. त्यांचे भूतकाळाच्या तुलनेत यथार्थ मूल्यमापन करणे सोपे आहे पण भविष्यात त्यांना त्यांचे योग्य स्थान देऊ करणे हे अधिक कठीण आहे.
बाहेरचे जग आणि त्याचे आपल्याबरोबर असलेले नाते आणि त्यांच्याबरोबर आपण कसा व्यवहार ठेवावा हे जाणणे ही तिसरी गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला आम्हाला हाच प्रश्न अधिक अवघड आणि प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो परंतु त्यावरील उपाय हा इतर सर्वांच्या उपायांवर अवलंबून आहे.”
पुढे लवकरच म्हणजे दि ३१ जुलै रोजी त्यांनी “An Open Letter to My Countrymen” या नावाचा लेख ‘कर्मयोगिन्’मध्ये प्रकाशित केला, त्यानंतर पुन्हा एकदा अरविंदांच्या मागे ब्रिटिशांचा ससेमिरा लागला. आपल्याला पुन्हा केव्हाही अटक होऊ शकते, याची जाणीव असल्यानेच त्यांनी हा लेख लिहिलेला होता. मी पुन्हा परतून येऊ शकलो नाही तर हे माझे राजकीय इच्छापत्र आहे असे समजावे, असे त्यांनी या लेखामध्ये म्हटले होते. या लेखाच्या शेवटी सारांशरूपाने त्यांनी राजकीय कृतिकार्यक्रम काय असावा याची रूपरेषा मांडली होती.
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…