‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष यांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते, पण योग म्हणजे काय? किंवा त्यासंबंधी काहीही माहीत नसताना आलेले ते अनुभव होते. उदाहरणार्थ, दीर्घ काळानंतर परत भारताच्या भूमीवर, मुंबई येथील अपोलो बंदरावर पहिले पाऊल ठेवताना आलेला शांतीच्या अवतरणाचा अनुभव; श्री शंकराचार्यांच्या टेकडीवरून (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगेवरून) फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा साक्षात्कार; नर्मदाकाठी चांदोद येथील देवळात, कालीच्या जिवंत उपस्थितीचा आलेला अनुभव; ….पण हे सारे आंतरिक अनुभव आपणहून, अनपेक्षितपणे आले होते; तो साधनेचा भाग नव्हता.
अरविंदांनी स्वत:हून गुरुविना, कोणाच्याशी मार्गदर्शनाविना साधनेला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र हा स्वामी ब्रह्मानंदांचा शिष्य होता, अरविंदांनी त्याच्याकडून काही नियम समजावून घेतले. सुरुवातीला ही साधना प्राणायामाच्या अभ्यासापुरतीच सीमित होती. अरविंदांनी जेव्हा योगसाधनेला सुरुवात केली तेव्हा योगसाधना व राजकारण यामध्ये कोणताही विरोध वा द्वंद्व नव्हते. या दोहोंमध्ये काही विरोध आहे अशी कल्पनाही त्यांच्या मनाला न शिवता त्यांची साधना चालू होती. पण ते गुरुच्या शोधात होते. त्या त्यांच्या शोधाच्या दरम्यान त्यांची एका नागा संन्यासाशी गाठभेट झाली. या नागा संन्याशाने काही मंत्र पुटपुटत, ग्लासमधील पाण्यामध्ये सुरीने छेद देत, जे पाणी अभिमंत्रित केले होते त्या पाण्यामुळे बारीन्द्र घोष यांचा (श्रीअरविंदांचे धाकटे बंधू) गंभीर ताप क्षणार्धात बरा झालेला पाहून योगशक्तीवरचा अरविंद घोष यांचा विश्वास वाढीस लागला तथापि अरविंदांनी त्या नागा संन्याशाला गुरु मानले नाही. स्वामी ब्रह्मानंदांनादेखील अरविंद भेटले आणि त्यांच्यामुळे ते खूप प्रभावितही झाले पण पुढे महाराष्ट्रातील एक योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांची भेट होईपर्यंत अरविंदांना गुरु म्हणून किंवा साहाय्यक म्हणून कोणीही भेटले नव्हते. (क्रमश:)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…