‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष यांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते, पण योग म्हणजे काय? किंवा त्यासंबंधी काहीही माहीत नसताना आलेले ते अनुभव होते. उदाहरणार्थ, दीर्घ काळानंतर परत भारताच्या भूमीवर, मुंबई येथील अपोलो बंदरावर पहिले पाऊल ठेवताना आलेला शांतीच्या अवतरणाचा अनुभव; श्री शंकराचार्यांच्या टेकडीवरून (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगेवरून) फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा साक्षात्कार; नर्मदाकाठी चांदोद येथील देवळात, कालीच्या जिवंत उपस्थितीचा आलेला अनुभव; ….पण हे सारे आंतरिक अनुभव आपणहून, अनपेक्षितपणे आले होते; तो साधनेचा भाग नव्हता.
अरविंदांनी स्वत:हून गुरुविना, कोणाच्याशी मार्गदर्शनाविना साधनेला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र हा स्वामी ब्रह्मानंदांचा शिष्य होता, अरविंदांनी त्याच्याकडून काही नियम समजावून घेतले. सुरुवातीला ही साधना प्राणायामाच्या अभ्यासापुरतीच सीमित होती. अरविंदांनी जेव्हा योगसाधनेला सुरुवात केली तेव्हा योगसाधना व राजकारण यामध्ये कोणताही विरोध वा द्वंद्व नव्हते. या दोहोंमध्ये काही विरोध आहे अशी कल्पनाही त्यांच्या मनाला न शिवता त्यांची साधना चालू होती. पण ते गुरुच्या शोधात होते. त्या त्यांच्या शोधाच्या दरम्यान त्यांची एका नागा संन्यासाशी गाठभेट झाली. या नागा संन्याशाने काही मंत्र पुटपुटत, ग्लासमधील पाण्यामध्ये सुरीने छेद देत, जे पाणी अभिमंत्रित केले होते त्या पाण्यामुळे बारीन्द्र घोष यांचा (श्रीअरविंदांचे धाकटे बंधू) गंभीर ताप क्षणार्धात बरा झालेला पाहून योगशक्तीवरचा अरविंद घोष यांचा विश्वास वाढीस लागला तथापि अरविंदांनी त्या नागा संन्याशाला गुरु मानले नाही. स्वामी ब्रह्मानंदांनादेखील अरविंद भेटले आणि त्यांच्यामुळे ते खूप प्रभावितही झाले पण पुढे महाराष्ट्रातील एक योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांची भेट होईपर्यंत अरविंदांना गुरु म्हणून किंवा साहाय्यक म्हणून कोणीही भेटले नव्हते. (क्रमश:)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…