‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष यांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते, पण योग म्हणजे काय? किंवा त्यासंबंधी काहीही माहीत नसताना आलेले ते अनुभव होते. उदाहरणार्थ, दीर्घ काळानंतर परत भारताच्या भूमीवर, मुंबई येथील अपोलो बंदरावर पहिले पाऊल ठेवताना आलेला शांतीच्या अवतरणाचा अनुभव; श्री शंकराचार्यांच्या टेकडीवरून (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगेवरून) फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा साक्षात्कार; नर्मदाकाठी चांदोद येथील देवळात, कालीच्या जिवंत उपस्थितीचा आलेला अनुभव; ….पण हे सारे आंतरिक अनुभव आपणहून, अनपेक्षितपणे आले होते; तो साधनेचा भाग नव्हता.
अरविंदांनी स्वत:हून गुरुविना, कोणाच्याशी मार्गदर्शनाविना साधनेला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र हा स्वामी ब्रह्मानंदांचा शिष्य होता, अरविंदांनी त्याच्याकडून काही नियम समजावून घेतले. सुरुवातीला ही साधना प्राणायामाच्या अभ्यासापुरतीच सीमित होती. अरविंदांनी जेव्हा योगसाधनेला सुरुवात केली तेव्हा योगसाधना व राजकारण यामध्ये कोणताही विरोध वा द्वंद्व नव्हते. या दोहोंमध्ये काही विरोध आहे अशी कल्पनाही त्यांच्या मनाला न शिवता त्यांची साधना चालू होती. पण ते गुरुच्या शोधात होते. त्या त्यांच्या शोधाच्या दरम्यान त्यांची एका नागा संन्यासाशी गाठभेट झाली. या नागा संन्याशाने काही मंत्र पुटपुटत, ग्लासमधील पाण्यामध्ये सुरीने छेद देत, जे पाणी अभिमंत्रित केले होते त्या पाण्यामुळे बारीन्द्र घोष यांचा (श्रीअरविंदांचे धाकटे बंधू) गंभीर ताप क्षणार्धात बरा झालेला पाहून योगशक्तीवरचा अरविंद घोष यांचा विश्वास वाढीस लागला तथापि अरविंदांनी त्या नागा संन्याशाला गुरु मानले नाही. स्वामी ब्रह्मानंदांनादेखील अरविंद भेटले आणि त्यांच्यामुळे ते खूप प्रभावितही झाले पण पुढे महाराष्ट्रातील एक योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांची भेट होईपर्यंत अरविंदांना गुरु म्हणून किंवा साहाय्यक म्हणून कोणीही भेटले नव्हते. (क्रमश:)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…