ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ब्रिटिश शासनाची अरविंद घोष यांच्यावर कायमच वक्र दृष्टी राहिली. त्यांच्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये ‘भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष’ अशी चर्चा असे. ‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये अरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. अरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले. या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले अरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लोकमान्य टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि. ०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात गुरूदेव रवीन्द्रनाथ टागोरांनी अरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली. ‘Salutation’ या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.

अरविंद यांना जेव्हा अटक झाली तेव्हा देशबंधू चित्तरंजन दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना त्यांनी अरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, “हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झालेली असतील, भविष्यात जेव्हाकेव्हा अरविंद या जगाचा निरोप घेतील तेव्हा ते ‘देशभक्त कवी’, ‘राष्ट्रवादाचे प्रणेते’ आणि ‘मानवतेचे प्रेमी’ म्हणून ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.” आणि कालौघात आज हे शब्द अक्षरश: खरे ठरत आहेत. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago