ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

बडोदा संस्थानामध्ये असलेल्या अरविंद घोष यांच्या विशेष हुद्द्यामुळे त्यांना जाहीररित्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणे शक्य नव्हते त्यामुळे, शेवटचा काही काळ ते सुट्टीवर राहून, पडद्याआडून राजकीय हालचालींमध्ये सक्रिय राहिले. इ. स. १९०५ साली मात्र वंगभंगामुळे उसळलेल्या जनक्षोभ आंदोलनामुळे त्यांना बडोदा येथील सेवेतून मुक्त होण्याची संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. याच वर्षी बंगालची फाळणी झाली आणि त्यानंतर जी एक बंडाची धुमाळी उडाली त्यामध्ये, जहाल पक्षाच्या उदयाला आणि महान राष्ट्रीय चळवळीला चालना मिळाली. तेव्हा अरविंद घोषांचे सर्व कृतिकार्यक्रम अधिकाधिकपणे त्या दिशेने वळू लागले.

बारीन्द्र यांच्या (अरविंदांचे धाकटे बंधू) सूचनेनुसार, अरविंदांनी ‘युगांतर’ नावाचे एक वृत्तपत्र प्रकाशित करावयास संमती दिली; ह्या वृत्तपत्रातून ब्रिटिश सत्तेचा पूर्ण निषेध आणि उघड विद्रोह याची शिकवण दिली जात असे. त्या वृत्तपत्रामध्ये ‘गनिमी कावा’ या युद्धपद्धतीविषयी पद्धतशीर प्रशिक्षण देणारी लेखमालिका चालविली जात होती. या वृत्तपत्राच्या प्रारंभिक अंकांमधून अरविंदांनी स्वत: सुरुवातीचे काही लेख लिहिले होते आणि कायमच त्या वृत्तपत्रावर त्यांचे सर्वसाधारणपणे नियंत्रण असे. स्वत: सादर केलेल्या प्रस्तावासाठी, संपादकीय विभागातील एक सदस्य, स्वामी विवेकानंदांचे बंधू, वृत्तपत्राच्या मुख्य संपादकांच्या शोधात आलेल्या पोलिसांना आपणहून शरण गेले होते आणि जेव्हा त्यांच्यावर खटला चालविण्यात आला होता तेव्हा, अरविंदांच्या आदेशानुसार ‘युगांतर’ने, ‘आम्ही विदेशी शासन ओळखत नाही’ या कारणास्तव, ब्रिटिश न्यायासनासमोर स्वत:ची बाजू मांडण्यास नकार दिला होता. आणि त्यामुळे या वृत्तपत्राची प्रतिष्ठा आणि प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढीस लागला. बंगालमधील तीन युवा लेखक या वृत्तपत्राचे मुख्य लेखक व संचालक होते; एकाएकी या वृत्तपत्राचा बंगाल प्रांतामध्ये प्रभाव वाढला. इ. स. १९०६ मध्ये अरविंद घोष यांनी बडोदा सोडले आणि नव्याने स्थापन झालेल्या ‘बंगाल नॅशनल कॉलेज’च्या प्राचार्यपदी रूजू होण्यासाठी ते कलकत्त्याला गेले.

बंगाल नॅशनल कॉलेजच्या स्थापनेमुळे अरविंदांना आवश्यक असलेली संधी चालून आली आणि त्यामुळे बडोदा संस्थानमधील नोकरीचा राजीनामा देऊन ते या नवीन कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू होऊ शकले. अरविंदांच्या गुप्त कार्यामधील त्यांचे सहकारी आणि नंतरच्या काळातदेखील काँग्रेसप्रणीत राजकारणामध्ये त्यांचे सहकारी असणारे श्री. सुबोध मलिक; यांनी या कॉलेजच्या स्थापनेसाठी एक लाख रूपये देऊ केले आणि अरविंदांना या कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर दरमहा १५० रू. पगारावर नेमण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; अशा प्रकारे देशकार्याच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ देण्यासाठी अरविंद घोष आता पूर्णपणे मोकळे झाले. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

2 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago