‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
इ. स. १९०३ मध्ये कामाचा भाग म्हणून अरविंद घोष बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत काश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेव्हा श्री शंकराचार्य मंदिराच्या टेकडीवर अरविंदांना अद्वैताचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव पुढे कवितारूपाने अभिव्यक्त झाला. तो असा –
जिथे शंकराचार्यांचे छोटेसे मंदिर उभे आहे त्या,
तख्त-ए-सुलेमानच्या राजमार्गावरून मी चालत होतो.
पृथ्वीचा व्यर्थ प्रणय संपुष्टात आणणाऱ्या
एका उघड्यावागड्या कड्यावरून,
काळाच्या कड्यावरून, मी एकाकीपणे
अनंततेला सामोरा जात होतो.
माझ्या सभोवताली निराकार एकांत पसरलेला होता.
अपरिमित उत्तुंग आणि अथांग
विश्व-नग्न अजन्मा एकमेव अशी ‘वास्तविकता’
येथे चिर-स्थिर झाली होती.
सारे काही एक अनोखे ‘अनामिक’ बनले होते.
‘मौन’ हाच त्या ‘सद्वस्तु’चा एकमेव शब्द होता,
आरंभ अज्ञात होता आणि अंत निःशब्द होता.
क्षणिक पाहिलेल्या वा ऐकलेल्या साऱ्या गोष्टींचा निरास करत,
‘निसर्ग’ रहस्यांच्या मूक शिखरावर
एकाकी ‘प्रशांत’ आणि शून्य अविकारी ‘शांती’ची
सत्ता पसरलेली होती.
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…