आंतरिक चेतनेची ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता
विचार शलाका – २७
व्यक्ती जेव्हा बाह्य जगात राहात असते तेव्हा ती आश्रमातल्याप्रमाणे वागू शकत नाही – व्यक्तीला इतरांमध्ये मिसळावे लागते आणि इतरांशी बाह्यत: सर्वसाधारण संबंध तरी ठेवावे लागतात. महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आंतरिक चेतना ‘ईश्वरा’प्रत उन्मुख ठेवणे आणि त्यात विकसित होणे. व्यक्ती जसजसे ते करू लागेल, तसतसा कमीअधिक वेगाने, साधनेच्या आंतरिक तीव्रतेनुसार इतरांविषयीचा तिचा दृष्टिकोन बदलेल. सर्व काही अधिकाधिकपणे ‘ईश्वरी’ दृष्टीने बघितले जाईल आणि भावना व कृती इत्यादी गोष्टी पूर्वीच्या बाह्य प्रतिक्रियांच्या द्वारा ठरविल्या न जाता, तुमच्या अंतरंगातील वर्धिष्णू अशा चेतनेच्याद्वारे ठरविल्या जातील.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 344)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026






