ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग

विचार शलाका – ०६

सच्च्या साधकभावाने जे जीवन व्यतीत करतात, जे ‘ईश्वरा’ठायीच त्यांची चेतना आणि एकाग्रता दृढ ठेवतात, फक्त ‘ईश्वर’ हेच ज्यांचे साध्य असते, जे दास्य भावाने ‘ईश्वरा’ची सेवा करतात, जे ‘ईश्वरा’शी संपूर्णतया एकनिष्ठ असतात, केवळ त्यांनाच ‘ईश्वर’ संरक्षण देऊ शकतो.

एखाद्याचा आवडीनिवडींचा, सुखसोयींचा आग्रह, दांभिकपणा, अप्रामाणिकपणा व मिथ्याचार यांच्या सर्व गतिविधी इत्यादी वासना या म्हणजे, ‘ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग अडवून उभे ठाकणारे प्रचंड अडथळे असतात. तुम्ही जर तुमची स्वत:ची इच्छा ‘ईश्वरा’वर लादू पहात असाल तर, ते म्हणजे एखादा बॉम्ब तुमच्यावर येऊन आदळावा म्हणून त्या बॉम्बलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. गोष्टी अशा रीतीनेच घडतील, असे मी म्हणत नाही. पण लोक जर जागरूक व अतिशय सतर्क झाले नाहीत आणि सच्च्या साधकभावाने वागले नाहीत, तर गोष्टी अशा रीतीनेच घडण्याची दाट शक्यता असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 121)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago