जेव्हा व्यक्ती ‘ईश्वरा’वर खऱ्या अर्थाने आणि समग्रतया प्रेम करत असते तेव्हा व्यक्ती त्या ‘ईश्वरा’ने निर्माण केलेल्या सृष्टीवर आणि प्राणिमात्रांवरही प्रेम करते आणि साहजिकपणेच, या प्राणिमात्रांमधील काही जण त्या व्यक्तीला निकटचे वाटू शकतात आणि त्यांच्यावर ती व्यक्ती विशेष प्रेम करत असते. परंतु तेव्हा व्यक्तीला जे प्रेम वाटते ते सामान्य मानवी प्रकारचे स्वार्थी प्रेम नसते; आपला ताबा असावा, मालकी असावी, अशा प्रकारची इच्छा असणारे ते प्रेम नसते; तर कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वतःला देऊ करणारे असे हे प्रेम असते.
प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम करणे ही शांतिपूर्ण आणि आनंदी जीवनासाठीची अत्युत्तम परिस्थिती असते; दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, सर्व वस्तुमात्रांमधील ‘ईश्वरा’वर प्रेम करावे.
‘ईश्वरा’ची जी इच्छा आहे अगदी तीच इच्छा बाळगण्यामध्ये जर त्याची परिणती झाली तर, मग तेथे परिपूर्ण शांती असते.
– श्रीमाताजी
(CWM 17 : 371)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…