जेव्हा व्यक्ती ‘ईश्वरा’वर खऱ्या अर्थाने आणि समग्रतया प्रेम करत असते तेव्हा व्यक्ती त्या ‘ईश्वरा’ने निर्माण केलेल्या सृष्टीवर आणि प्राणिमात्रांवरही प्रेम करते आणि साहजिकपणेच, या प्राणिमात्रांमधील काही जण त्या व्यक्तीला निकटचे वाटू शकतात आणि त्यांच्यावर ती व्यक्ती विशेष प्रेम करत असते. परंतु तेव्हा व्यक्तीला जे प्रेम वाटते ते सामान्य मानवी प्रकारचे स्वार्थी प्रेम नसते; आपला ताबा असावा, मालकी असावी, अशा प्रकारची इच्छा असणारे ते प्रेम नसते; तर कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वतःला देऊ करणारे असे हे प्रेम असते.
प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम करणे ही शांतिपूर्ण आणि आनंदी जीवनासाठीची अत्युत्तम परिस्थिती असते; दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, सर्व वस्तुमात्रांमधील ‘ईश्वरा’वर प्रेम करावे.
‘ईश्वरा’ची जी इच्छा आहे अगदी तीच इच्छा बाळगण्यामध्ये जर त्याची परिणती झाली तर, मग तेथे परिपूर्ण शांती असते.
– श्रीमाताजी
(CWM 17 : 371)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…