समर्पण – १५
ईश्वराशी ऐक्य म्हणजे योग आणि योग हा आत्मदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतो – तुम्ही ईश्वराप्रत जे आत्मदान करता त्याच्या पायावर तो उभा राहतो. प्रारंभी तुम्ही या आत्मदानाची सुरुवात अगदी सरसकट करता, म्हणजे जणू कायमसाठी एकदाच आत्मदान करता; तुम्ही म्हणता, ‘मी ईश्वराचा सेवक आहे, माझे जीवन मी पूर्णतः ईश्वराला दिले आहे, आणि माझे सारे प्रयत्न दिव्य जीवनाच्या साक्षात्कारासाठीच आहेत.” परंतु ही फक्त पहिली पायरी आहे, कारण ही गोष्ट पुरेशी नाही. जरी तुम्ही निश्चय केलेला आहे, जरी तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन ईश्वराला देऊ करण्याचे ठरविलेले आहे तरीदेखील प्रत्येक क्षणाला तुम्हाला त्याची आठवण ठेवली पाहिजे आणि तुमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी ती प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक पावलागणिक ही आठवण पाहिजे की, तुम्ही ईश्वराचे आहेत; तुम्ही कोणताही विचार करत असा किंवा कर्म करत असा, तुमच्या माध्यमातून ती ईश्वरी चेतनाच कार्य करत आहे, असा तुम्हाला सतत अनुभव यायला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीला तुमची स्वतःची असे संबोधू शकाल अशी कोणतीच गोष्ट असता कामा नये; सारे काही ईश्वराकडूनच येत आहे असे तुम्हाला जाणवले पाहिजे आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या त्या गोष्टीच्या स्रोताला परत अर्पण केली पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते तेव्हा, एरवी ज्या गोष्टीकडे तुम्ही फारसे लक्ष पुरविले नसते, किंवा ज्याची एरवी फारशी पर्वा केली नसती अशा कोणत्याच गोष्टी आता क्षुल्लक, किरकोळ उरत नाहीत; त्या साऱ्यांनाच एक अर्थ प्राप्त होतो आणि पलीकडील एक विशाल क्षितिज खुले होते.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 23)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…