समर्पण – ०६
हृदयामध्ये ईश्वराद्वारे मला सतत मार्गदर्शन मिळत आहे अशी एखाद्या व्यक्तीची समजूत असणे, हे काही अनिवार्यपणे समर्पणच असते असे नाही. समर्पण असण्यासाठी व्यक्तीने निःसंग असले पाहिजे आणि दिव्य शक्ती कोणत्या व अदिव्य शक्ती कोणत्या ते ओळखून, व्यक्तीने अदिव्य शक्तींना नकार दिला पाहिजे. अशा प्रकारे विवेक बाळगल्यानेच व्यक्ती हृदयस्थ ईश्वराप्रत खरेखुरे समर्पण करू शकते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 68)
*
जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांनाही हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ”परिस्थितीच कठीण आहे,” असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही.” तर ते योग्य आहे. आणि मग ईश्वरी दिव्यकृपा तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. दिव्य कृपेबद्दलचा जो पूर्ण विश्वास असतो त्यातून उदयाला येणाऱ्या सुहास्य वदनासारख्याच सुहास्य वदनाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.
– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…