जे लोक जीवनापासून निवृत्त होतात, आध्यात्मिक जीवनाच्या प्राप्तीसाठी लौकिक जीवनाचा परित्याग करतात त्यांचा मार्ग म्हणजे गूढ साधनेचा मार्ग असे मला म्हणावयाचे आहे. हे लोक लौकिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही जीवनांमध्ये फारकत करतात आणि म्हणतात “एक तर हे नाहीतर ते दुसरे.” आम्ही म्हणतो, “यात तथ्य नाही.” जीवनामध्येच आणि पूर्णपणे, समग्रतेने जीवन जगत असतांनाच व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगू शकते, जगले पाहिजे. परमोच्च चेतनेला येथे भूतलावरच आणायचे आहे.
निखळ जडभौतिक आणि प्राकृतिक दृष्टिकोनातून पाहिले असता, मनुष्य हा काही शेवटची प्रजाती नव्हे. प्राण्यानंतर जसा मानव आला तसाच मानवानंतर दुसरा जीव यायलाच हवा. आणि सर्वत्र एकाच चैतन्याचे (जाणीवशक्तीचे) अस्तित्व असल्यामुळे, तेच चैतन्य वा तीच चेतना मानवत्वाचा अनुभव प्राप्त केल्यानंतर, अतिमानवीय अस्तित्वाचा अनुभव घेईल. आणि म्हणूनच जर आपण दूर कोठेतरी जाऊ, जीवनाला सोडून देऊ, जर जीवनास नकार देऊ तर, आपली त्यासाठी कधीच तयारी होणार नाही.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 330-31)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…