जे लोक जीवनापासून निवृत्त होतात, आध्यात्मिक जीवनाच्या प्राप्तीसाठी लौकिक जीवनाचा परित्याग करतात त्यांचा मार्ग म्हणजे गूढ साधनेचा मार्ग असे मला म्हणावयाचे आहे. हे लोक लौकिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही जीवनांमध्ये फारकत करतात आणि म्हणतात “एक तर हे नाहीतर ते दुसरे.” आम्ही म्हणतो, “यात तथ्य नाही.” जीवनामध्येच आणि पूर्णपणे, समग्रतेने जीवन जगत असतांनाच व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगू शकते, जगले पाहिजे. परमोच्च चेतनेला येथे भूतलावरच आणायचे आहे.
निखळ जडभौतिक आणि प्राकृतिक दृष्टिकोनातून पाहिले असता, मनुष्य हा काही शेवटची प्रजाती नव्हे. प्राण्यानंतर जसा मानव आला तसाच मानवानंतर दुसरा जीव यायलाच हवा. आणि सर्वत्र एकाच चैतन्याचे (जाणीवशक्तीचे) अस्तित्व असल्यामुळे, तेच चैतन्य वा तीच चेतना मानवत्वाचा अनुभव प्राप्त केल्यानंतर, अतिमानवीय अस्तित्वाचा अनुभव घेईल. आणि म्हणूनच जर आपण दूर कोठेतरी जाऊ, जीवनाला सोडून देऊ, जर जीवनास नकार देऊ तर, आपली त्यासाठी कधीच तयारी होणार नाही.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 330-31)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…