श्रीमाताजी : ऑरोविलवासीयांनी अन्नासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण त्यांनी त्याबदल्यात काही काम केले पाहिजे किंवा ते ज्याचे उत्पादन करतात ते त्यांनी देऊ केले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील पीक दिले पाहिजे; ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील उत्पादने दिली पाहिजेत; कोणी अन्नाच्या मोबदल्यात श्रमदान केले पाहिजे.
आणि त्यातूनच बऱ्याच अंशी पैशाची अंतर्गत देवाणघेवाण संपुष्टात येईल. प्रत्येक बाबतीतच आपण अशा गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. मूलत: ही अशा जीवनप्रणालीच्या अभ्यासाची व संशोधनाची नगरी असेल की, जी जीवनप्रणाली अधिक साधीसोपी असेल आणि जिच्यामध्ये उच्चतर गुणांचा विकास करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध असेल.
ही फक्त एक छोटी सुरुवात आहे….
मला या गोष्टीवर भर द्यावयाचा आहे की, ऑरोविल हा एक प्रयोग असेल. ऑरोविल हे प्रयोग करण्यासाठी; प्रयोग, संशोधन व अभ्यास यांसाठीच आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 263-64)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…