अशा उदाहरणात, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावयाचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असावयास हवी, म्हणजे ती प्राणामध्ये आध्यात्मिक योद्धा असावयास हवी. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी तेच बनावयास हवे आणि जेव्हा ते तसे बनतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित असतात.
पण तसे बनण्याची एक पूर्वअट म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रीतीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, त्यांच्याकडून तुमच्यावर आघात होण्याची शक्यता असतेच असते.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…