अशा उदाहरणात, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावयाचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असावयास हवी, म्हणजे ती प्राणामध्ये आध्यात्मिक योद्धा असावयास हवी. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी तेच बनावयास हवे आणि जेव्हा ते तसे बनतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित असतात.
पण तसे बनण्याची एक पूर्वअट म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रीतीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, त्यांच्याकडून तुमच्यावर आघात होण्याची शक्यता असतेच असते.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…