ईश्वर आणि आपले नाते निर्माण होण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीला म्हणजे आपण कनिष्ठ पातळीवर असताना, प्रार्थना आपली तयारी करून घेत असते. त्यावेळी ती प्रार्थना, आपल्या अहंवादी आणि आत्मभ्रांत अवस्थेशी जरी मिळतीजुळती असली तरीसुद्धा, ती त्या नात्याची पूर्वतयारी करून घेत असते; आणि कालांतराने प्रार्थनेमागे असलेल्या आध्यात्मिक सत्याकडे आपले लक्ष वळवले जाऊ शकते.
तेव्हा मग, मागितलेली गोष्ट ईश्वराकडून मिळणे, न मिळणे हे महत्त्वाचे राहत नाही; महत्त्वाचे असते ते भक्ताचे ईश्वराशी असलेले नाते, ईश्वराशी घडलेला संपर्क आणि ईश्वराशी असलेला जाणीवयुक्त संबंध !
आध्यात्मिक व्यवहारात, आध्यात्मिक प्राप्तीसाठी धडपड करताना, ईश्वराशी आपले हे जाणीवयुक्त नाते ही फार मोठी शक्ती असते; सर्वस्वी स्वत:वर विश्वास ठेवून केलेला संघर्ष व प्रयत्न यांच्यापेक्षा ह्या नात्यामध्ये कितीतरी अधिक ताकद असते आणि त्यामधून आपली आध्यात्मिक वाढ होऊन आपल्याला, परिपूर्ण अशी अनुभूती येते.
अंतत: ज्या एका महान गोष्टीसाठी प्रार्थनेच्या माध्यमातून आपली तयारी करून घेतली गेली होती, ती गोष्ट गवसल्याबरोबर प्रार्थनेचे अस्तित्व संपुष्टात येते किंवा प्रार्थना शिल्लक उरलीच तर ती नात्याच्या आनंदासाठी शिल्लक उरते. (वास्तविक, भक्ताकडे जर श्रद्धा, इच्छा, अभीप्सा या गोष्टी असतील तर ज्याला आपण ‘प्रार्थना’ हे नाव देतो ती आवश्यकच असते असे मात्र नाही.)
जोवर आपण सर्वोच्च निर्हेतुक अशा भक्तिपर्यंत जाऊन पोहोचत नाही, म्हणजेच जोवर आपण इच्छाविरहित वा मागणीविरहित शुद्ध, ऋजु अशा दिव्य प्रेमापर्यंत जाऊन पोहोचत नाही, तशी भक्ति जोवर आपल्या अंत:करणात उदयास येत नाही तोवर ती प्रार्थना, जो ‘अर्थ’, जी उद्दिष्टे, प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत असते, रस घेत असते ती तिची उद्दिष्टे अधिकाधिक उन्नत होत जातात.
– श्रीअरविंद
(CWSA 24 :567-568)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…