स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव शोकांतिका आहे आणि तरीही त्याची त्याला खंत वाटत नाही. वास्तविक, स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये त्याचे मार्गदर्शन पूर्णतया न लाभणे हीच खरेतर एकमेव शोकांतिका आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन न जगताच मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.
स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे, हेच खरे महाकाव्य, हेच खरे वैभव!
– श्रीमाताजी (CWM 10 : 277)





