Tag Archive for: जग

 

स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती फिरत राहणे हीदेखील त्याची आणखी एक गती आहे.

*

आधी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्या‌विषयी सचेत व्हा, मग विचार करा आणि तदनंतर कृती करा. सर्वंकष चैतन्यमय विचार हा ज्याची पूर्वतयारी चालू आहे असे एक जग असते आणि सर्व खऱ्या कृती म्हणजे आविष्कृत झालेला विचार असतो. एक सत्य-कल्पना (Idea) दिव्य आत्म-चेतनेमध्ये क्रीडा करू लागली आणि त्यातून हे जडभौतिक जग अस्तित्वात आले.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

जग जसे आहे तसे आहे. जग क्षुद्रतेने आणि अंधकाराने भरलेले आहे; त्याला तुम्हास अस्वस्थ करण्याची मुभा देऊ नका. केवळ ईश्वरच प्रकाश आणि व्यापकता, सत्य आणि करुणा आहे. म्हणून त्या ईश्वराचाच आश्रय घ्या आणि जगाच्या क्षुद्रतेविषयी काळजी करू नका; केवळ ईश्वराची उपस्थिती, त्याच्या शांती व निश्चलतेसहित तुमच्यामध्ये बाळगा.

– श्रीमाताजी
(White roses : 02)