Posts

विचार शलाका – २९

…‘अवतार’ कोणत्या कारणासाठी जन्म घेतात? तर मानवाला पुन्हा पुन्हा अधिकाधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी; त्याच्यामध्ये उच्च, उच्चतर, अधिकाधिक उच्चतर अशी मानवता विकसित व्हावी यासाठी; दिव्य जीवाचा अधिकाधिक महान विकास व्हावा यासाठी; जोवर आपले परिश्रम पूर्णत्वाला जात नाहीत, आपले कार्य सिद्धीस जात नाही आणि या जडभौतिक विश्वामध्येसुद्धा ‘सच्चिदानंद’ परिपूर्णतेने भरून जात नाही, तोवर या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अधिकाधिक स्वर्गलोकाचे अवतरण घडविण्यासाठी, अवतार जन्माला येत असतात. केवळ स्वतःच्या किंवा काही मोजक्या लोकांच्या मुक्तीसाठी जर एखादा परिश्रम करत असेल आणि जरी तो त्यात यशस्वी झाला तरी त्याचे कार्य हे लहानच असते. परंतु जो अखिल मानवजातीच्या पूर्णत्वासाठी, शुद्धतेसाठी, आनंदासाठी, जिवाच्या शांतीसाठी प्रयत्नशील राहतो आणि त्यासाठीच जीवन जगतो, तो जरी अयशस्वी झाला किंवा जरी त्याला त्यामध्ये आंशिकच यश मिळाले किंवा काही काळापुरतेच यश मिळाले तरी, त्याचे ते कार्य अनंतपटीने महान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)