सार्वभौम चेतनेचा शोध

मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही) तर ते तितकेसे जबाबदारीने वागत नाही. बरेचदा ते प्रकृतीच्या शक्तींच्या हातातले बाहुले बनलेले असते. मात्र आपले आंतरिक किंवा उच्चतर अस्तित्व, आपली सखोल चेतना ही आपल्या नियतीची स्वामिनी असते; ती आपली नियती घडवत असते. आणि म्हणूनच या सार्वभौम चेतनेचा शोध घेणे आणि जीवनातील सर्व विसंवाद, प्रकृतीमधील सर्व संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तिच्याशी एकत्व पावणे अत्यंत महत्त्वाचे असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 335)

श्रीमाताजी