शांती आणि आनंद मिळण्यासाठी…
ईश्वराची जी इच्छा आहे तीच अगदी पूर्ण प्रामाणिकपणे आपली इच्छा होणे, ही जीवनात शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक असणारी अट आहे. आपल्याला काय हवे आहे आणि जीवनाने आपल्याला काय प्रदान करायला हवे, हे ईश्वरापेक्षा आपल्याला जास्त चांगले समजते, अशी माणसांची जवळजवळ नेहमीच खात्री असते आणि यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात.
इतर व्यक्तींनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि परिस्थितीने देखील आपल्याच इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सर्व माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळेच ते दुःखीकष्टी होतात.
– श्रीमाताजी (CWM 16 : 433)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- चैत्य पुरुष म्हणजे काय? - September 14, 2026
- तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व - September 13, 2026
- दिव्य अस्तित्वाचा शोध - September 11, 2026







