Entries by श्रीमाताजी

प्रामाणिकपणा – ०६

प्रामाणिकपणा – ०६ तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या तत्त्वाशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता. प्रत्येक क्षणी म्हणजे, तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रीतीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी […]

प्रामाणिकपणा – ०५

प्रामाणिकपणा – ०५ ….केवळ बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा’ प्रत्यक्षात तसे ‘असणे’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण आणि निर्दोष असेल, तर आपण चांगले आहोत असे दाखविण्याची गरज नाही. आणि ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा’ म्हणजे आम्हाला असे म्हणायचे आहे की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, फक्त आपल्या अस्तित्वाचे मध्यवर्ती ‘सत्-तत्त्व’च आविष्कृत झाले […]

प्रामाणिकपणा – ०२

प्रामाणिकपणा – ०२ प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व भागांनी ‘ईश्वरा’प्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक आहे – म्हणजे असे की, एखाद्या भागाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे अंग मात्र त्याला नकार देते किंवा बंड करते, असे असता कामा नये. अभीप्सेमध्ये प्रामाणिकता असणे याचा अर्थ, ‘ईश्वरा’साठीच ‘ईश्वर’ हवा असणे, प्रसिद्धी अथवा नावलौकिक अथवा प्रतिष्ठा अथवा […]

प्रामाणिकपणा – ०१

प्रामाणिकपणा – ०१ आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा! प्रामाणिकपणा हा केंद्रीय ‘दिव्य संकल्पा’च्या भोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो. – श्रीमाताजी [CWM 14 : 65]

‘ईश्वरा’कडून आलेल्या गोष्टींचा स्वीकार

कर्म आराधना – ४२ त्या सर्व गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत, ज्या ‘ईश्वरा’कडून आलेल्या असतात, फक्त त्यांचाच स्वीकार तुम्ही केला पाहिजे. कारण छुप्या इच्छावासनांकडून देखील काही गोष्टी समोर येऊ शकतात. या इच्छावासना तुमच्या अवचेतन मनामध्ये कार्यरत असतात आणि जरी तुम्हाला त्या तुमच्या इच्छा म्हणून ओळखता आल्या नाहीत तरीसुद्धा, त्या इच्छावासना तुमच्या समोर अशा गोष्टी आणतात की, […]

खराखुरा योगिक दृष्टिकोन

कर्म आराधना – ४१ ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच […]

मानवतेची सेवा

कर्म आराधना – ४० मानवतेची सेवा करण्याची कल्पना ही महत्त्वाकांक्षेच्या अत्यंत सामान्य रूपांपैकी एक रूप आहे. अशा प्रकारच्या सेवेविषयी किंवा कार्याविषयी असणारी सर्व आसक्ती ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची खूण असते. ज्या ‘गुरुं’ची अशी समजूत असते की, त्यांच्यापाशी मानवतेला शिकविण्यासाठी एक फार महान सत्य आहे आणि ज्यांना भरपूर मोठा शिष्यवर्ग हवा असतो आणि शिष्य त्यांच्यापासून निघून जातात […]

आळस आणि अक्रियता

कर्म आराधना – ३७ आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात. स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. * […]

कौशल्यपूर्ण कर्म

कर्म आराधना – १५ कौशल्यपूर्ण हात, स्वच्छ दृष्टी, एकाग्र अवधान, अथक चिकाटी या गोष्टी व्यक्तीपाशी असताना व्यक्ती जे काही करेल ते उत्कृष्टच असेल. * कौशल्यपूर्ण हात, काटेकोर काळजी, टिकून राहणारे अवधान या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती ‘जडभौतिका’ला ‘चैतन्या’च्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते. – श्रीमाताजी (CWM 14 : 308)

कार्य अर्धवट सोडून द्यायचे ?

कर्म आराधना – १४ एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. * एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच […]