Entries by श्रीअरविंद

चैत्य पुरुष आणि अनुभव

तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा. याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा […]

चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक अटी

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक प्रेरणांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल, तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष पूर्णत: खुला होईल. जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण वा प्रेरणेची अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन जर योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण […]

चैत्य पुरुष पुढे आणणे

चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची मान्यताप्राप्त अशी कोणतीही पद्धत नसते. ते अभीप्सेवर, श्रद्धेच्या, भक्तीच्या वाढीवर, मानसिक, प्राणिक अहंकार व त्याच्या गतिविधींची पकड कमी होण्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे जर विकास होत राहिला तर, एका विवक्षित क्षणी चैत्य पुरुष आणि उर्वरित इतर प्राकृतिक घटक यांमधील पडदा पातळ पातळ होत जातो आणि तो फाटायला सुरुवात होते आणि मग […]

निष्पाप बालकं आणि चैत्य पुरुष

तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांत लक्षपूर्वक पाहा, तेथे तुम्हाला एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काहीजण त्याचे वर्णन निष्पाप असे करतात – परंतु तो प्रकाश खूप खरा असतो, खूपच सत्य असतो, जो या जगाकडे आश्चर्याने टुकूटुकू पाहत असतो. ही आश्चर्याची भावना, ही चैत्याची (Psychic) आश्चर्यभावना असते, की जी सत्य पाहू शकते पण तिला या जगाविषयी फारसे काही […]

देवाची नामी व्यवस्था

श्रीअरविंद त्यांच्या आजीआजोबांविषयीची एक गोष्ट सांगत असत. त्यांची आजी एकदा म्हणाली, “देवाने हे इतके वाईट जग का बनविले आहे? मी जर त्याला भेटू शकले तर तो भेटल्यावर त्याच्याविषयी मला काय वाटते ते मी त्याला सांगणार आहे.” त्यावर आजोबा म्हणाले, “हो बरोबर आहे. पण देवाने अशी नामी व्यवस्था करून ठेवली आहे की, जोवर तुमच्यामध्ये अशा व […]

परमात्मा, आत्मा, जीवात्मा आणि चैत्य पुरुष

जे अस्तित्व आपल्यामधील इतर सर्व बाबींना आधार पुरविते आणि जन्म आणि मृत्युच्या फेऱ्यांमधूनही जे टिकून राहते अशा आपल्यातील ईश्वरांशाला, सहसा आपल्या योगामध्ये ‘केंद्रवर्ती अस्तित्व’ अशी संज्ञा वापरण्यात येते. केंद्रवर्ती अस्तित्वाची दोन रूपे असतात – वरच्या भागात असणारे अस्तित्व म्हणजे जीवात्मा, आपले सत् अस्तित्व. आपल्याला जेव्हा उच्चतर असे आत्म-ज्ञान प्राप्त होते तेव्हा, आपल्याला ह्या अस्तित्वाची जाण […]

शाश्वत परब्रह्म

आध्यात्मिक ज्ञानाचे मन ज्या एकमेव उद्दिष्टाकडे वळले पाहिजे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत परब्रह्म होय. या इथे प्रकृतीच्या धुक्याने परिवेष्टित झालेला आणि अभ्राच्छादित झालेला आत्मा, त्या ‘शाश्वता’वर लक्ष स्थिर करून, स्वत:ची स्वाभाविक असणारी अशी अमर्त्यतेची आणि विश्वातीततेची मूळ चेतना पुन:प्राप्त करून घेऊन, तिचा आनंद घेतो. – श्रीअरविंद (CWSA 19 : 415)

लोकशाही

आज ज्या प्रकारची ‘लोकशाही’ अस्तित्वात आहे ती काही अंतिम अवस्था नाही किंवा त्या अवस्थेच्या जवळपास जाईल अशीही ती व्यवस्था नाही. कारण दिसताना जरी ती लोकशाही दिसत असली आणि अगदी ती कितीही उत्तम प्रकारे चालत असली तरीही तेथे केवळ बहुमताचेच राज्य चालते; आणि पक्षीय शासनाच्या सदोष अशा पद्धतीद्वारेच ती कार्यरत असते. …आणि अगदी परिपूर्ण अशी लोकशाही […]

श्रीअरविंदांच्या दृष्टिक्षेपातील अखंड भारत

(भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित करण्यात आला. तो येथे देत आहोत.) १५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस! भारतासाठी हा जुन्या युगाच्या अंताचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा संकेत आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर त्याचे मोल […]

नूतन भारत (New India)

(भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना ऑगस्ट १९४७ रोजी, ‘महायोगी श्रीअरविंद’ यांनी दिलेल्या संदेशातील हा अंशभाग – त्याला आजही समकालीन संदर्भ आणि मूल्य आहे…) ….भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी आपली भूमिका पार पाडायला सुरुवात केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि राष्ट्रसमूहांच्या समितीमध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे. समग्र […]