Entries by श्रीअरविंद

निसर्गाचे रहस्य – ११

पृथ्वी ही जडभौतिक विश्वाचे केंद्र आहे. ज्या शक्तीद्वारे ‘जडभौतिका’चे रूपांतरण घडून येणार आहे त्या शक्तीच्या एककेंद्रीकरणासाठी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ‘जडभौतिका’मधील ईश्वरी क्षमतेचे ती प्रतीक आहे. …‘ईश्वरी चेतने’च्या थेट हस्तक्षेपामुळे या पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे फक्त या पृथ्वीवरच ‘ईश्वरा’शी थेट संपर्क होऊ शकतो आणि तसा तो होतो देखील. पृथ्वी दिव्य प्रकाश शोषून घेते, […]

दुःखभोग म्हणजे काय?

विचार शलाका – ३२   प्राथमिक स्तरावर, दुःखभोग म्हणजे आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपल्याला कळावे म्हणून ‘प्रकृती’ने केलेली सूचना असते; आणि सुखोपभोग म्हणजे, आपण ज्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे त्यासाठी ‘प्रकृती’ने ठेवलेले प्रलोभन असते.   – श्रीअरविंद (CWSA 13 : 373)

नियती आणि ईश्वरी कृपा

विचार शलाका – ३१   व्यक्ती जोवर ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तीच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आपण ज्याला ‘नियती’ म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या ऊर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा […]

शांतीची प्राप्ती

विचार शलाका – ३०   व्यक्ती जोपर्यंत सामान्य मानवी चेतनेमधून बाहेर पडून, तिच्या खऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे, जेथे सर्व बंध मुक्त होतात अशा उच्चतर आध्यात्मिक चेतनेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत ‘कर्मा’च्या परिणामांचे बंधन शिल्लक असते. शांतीबाबत सांगायचे तर, ‘ईश्वरा’वर पूर्ण भरवसा आणि ‘ईश्वरी संकल्पा’प्रत समर्पण यातून ती प्राप्त होऊ शकते.   – श्रीअरविंद (CWSA 28 […]

अशांतीचे क्षेत्र

विचार शलाका – २८ सांसरिक जीवन हे स्वभावत:च ‘अशांतीचे क्षेत्र’ आहे. त्यामधून जर योग्य रीतीने वाटचाल करायची असेल तर, व्यक्तीने आपली कर्मं आणि आपले जीवन ‘ईश्वरा’ला समर्पित केले पाहिजे आणि आपल्या अंतरंगातील ‘दिव्य’ शांतीसाठी त्या ‘ईश्वरा’ची प्रार्थना केली पाहिजे. मन जेव्हा शांत, स्थिर होते तेव्हा, ‘दिव्यमाता’च आपल्या जीवनाला आधार देत आहे असे व्यक्ती अनुभवू शकते […]

आंतरिक चेतनेची ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता

विचार शलाका – २७ व्यक्ती जेव्हा बाह्य जगात राहात असते तेव्हा ती आश्रमातल्याप्रमाणे वागू शकत नाही – व्यक्तीला इतरांमध्ये मिसळावे लागते आणि इतरांशी बाह्यत: सर्वसाधारण संबंध तरी ठेवावे लागतात. महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आंतरिक चेतना ‘ईश्वरा’प्रत उन्मुख ठेवणे आणि त्यात विकसित होणे. व्यक्ती जसजसे ते करू लागेल, तसतसा कमीअधिक वेगाने, साधनेच्या आंतरिक तीव्रतेनुसार इतरांविषयीचा […]

आध्यात्मिक समतेमध्ये विकसित होणे

विचार शलाका – २६ व्यक्तीला जेव्हा सर्वसामान्य वातावरणात राहून, दैनंदिन जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला तयार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे – सर्वांगीण समता व अलिप्तता, आणि या अज्ञानमय विश्वात सद्यस्थितीतदेखील ‘ईश्वर’ आहे आणि ‘ईश्वरी इच्छा’ सर्व गोष्टींमध्ये कार्यकारी आहे याविषयी सश्रद्ध राहून, ‘गीते’मध्ये सांगितल्यानुसार ‘समता’वृत्तीची जोपासना करणे – हा आहे. …व्यक्तीमध्ये तसेच प्रकृतीमध्ये, […]

योगाच्या पूर्वअटी

विचार शलाका – २३ (आम्हाला आश्रमामध्ये येऊनच योगसाधना करायची आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना श्रीअरविंद सांगत आहेत…) एखादी व्यक्ती जर दूर अंतरावर राहून साहाय्य प्राप्त करून घेऊ शकली नाही तर ती व्यक्ती येथे (आश्रमात) योगसाधना करण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते? (पूर्णयोग) ही अशी योगपद्धती आहे की जी तोंडी सूचना किंवा इतर कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. […]

शिक्षण आणि बौद्धिक प्रशिक्षण

विचार शलाका – १७ एकेकाळी ज्याबद्दल आशा बाळगण्यात आली होती की, शिक्षण आणि बौद्धिक प्रशिक्षण यामुळे माणूस बदलू शकेल; पण तसे प्रत्यक्ष अनुभवांती आढळून आले नाही. त्यामुळे झाले काय तर, मानवाच्या वैयक्तिक आणि सामूहिक अहंभावाला, त्याच्या स्व-दृढीकरणासाठी (self-affirmation) अधिक चांगली माहिती प्राप्त झाली आणि अधिक कार्यक्षम अशी यंत्रणा उपलब्ध झाली इतकेच, पण मानवाचा पूर्वीचा अपरिवर्तित […]

आपल्यापुढील तातडीचे व महत्त्वाचे कार्य

विचार शलाका – १२ लोकांची मनं, चारित्र्य व अभिरुची उच्च पातळीवर नेणे, स्वभावाचा प्राचीन उमदेपणा परत प्राप्त करून घेणे, सामर्थ्यशाली असे ‘आर्य’ चारित्र्य आणि उच्च कोटीचा ‘आर्य’ दृष्टिकोन, पार्थिव जीवन सुंदर व अद्भुतरम्य बनवणारी समज यांचे पुनरुज्जीवन करणे आणि अशी नेत्रदीपक अभीप्सा, आध्यात्मिक अनुभव, साक्षात्कार की ज्यामुळे आपण या भूतलावरील सर्व मानवसमूहांमध्ये अधिक विशाल-हृदयी, सखोल […]