बदलास नाखूष असणारा घटक
(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण श्रीमाताजी समजावून सांगत आहेत.)
व्यक्तीमध्ये एखादा घटक असा असतो की, त्याच्यामध्ये अभीप्सा असते, तो ईश्वराप्रत समर्पित असतो आणि त्याचवेळी त्या व्यक्तीमध्ये इतर काही घटक असे असतात – कधीकधी एखादा छोटासाच घटक असतो, तर कधीकधी मोठाही असू शकतो – तो तळाशी, खूप खोलवर व्यवस्थित लपून बसलेला असतो. तो कोणाला सापडू नये अशा रितीने कोणतीही चुळबूळ न करता, अगदी शांतपणे तेथे दडून बसलेला असतो आणि तो त्याच्या पूर्ण ताकदीनिशी बदलासाठी विरोध करत राहतो.
व्यक्ती मात्र विचार करत राहते, “माझ्यामध्ये इतकी उत्कट अभीप्सा आहे, इतकी सदिच्छा आहे, माझ्यामध्ये बदल करावा असे मला अगदी मनापासून वाटत आहे, आणि असे असूनही माझ्यामध्ये काहीच बदल होत नाहीये. असे का?” अशा वेळी त्या व्यक्तीचा मानसिक उद्धटपणा आड येतो आणि म्हणू लागतो, “मला माझ्या योग्यतेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाहीये, ईश्वरी कृपा मला साहाय्य करत नाहीये आणि मला एकट्यालाच हे सारे प्रयत्न करावे लागत आहेत. इत्यादी इत्यादी…” पण हे तसे नसते.
तो तुमच्यामध्येच वेटोळे घालून बसलेला, पुष्ट झालेला, स्वतःमध्येच मश्गुल झालेला आणि दडून बसलेला, तुमच्यामधीलच एक घटक असतो. तो जणू काही पेटीच्या अगदी तळाशी लपून राहिलेला, बदल करण्यास नकार देणारा घटक असतो. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 06 : 242-243)
- विश्वाचे गंतव्यस्थान? - July 12, 2026
- अतिमानसाचे कार्य - July 11, 2026
- श्रीअरविंद यांचा संदेश - July 10, 2026






